आ. मनोज घोरपडे यांची विधानसभेत मागणी; शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी कराड/प्रतिनिधी : – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर होत असलेल्या कारवाईच्या ऐवजी बोगस बियाणे व निकृष्ट शेतीसामुग्री पुरवणाऱ्या उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी राज्य विधानसभेत केली आहे. राज्य विधानसभेत केली मागणी : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांमार्फत खते, बियाणे व कीडनाशके यांचा पुरवठा केला जातो. मात्र, याच केंद्रांमार्फत बोगस व कालबाह्य बी-बियाणे आणि निकृष्ट दर्जाची खते-औषधे विकली जात असल्याचे गंभीर प्रकार मागील काही काळात उघडकीस आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, पुनर्लागवडीची वेळ येत आहे. परिणामी उत्पादनक्षमता घटते आहे, असे आ. घोरपडे यांनी सभागृहात स्पष्ट केले. कंपनीकडूनही दखल घेतली जात नाही : “शेतकरी कृषी सेवा केंद्रावर तक्रार करत असताना केंद्रचालक जबाबदारी झटकून थेट उत्पादक कंपनीकडे