अमित शहा; राहुल गांधी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर डागले टीकास्त्र
कराड/प्रतिनिधी : –
2019 च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या झेंड्याखाली भाजप – शिवसेनेने निवडणूक लढवली. परंतु, 370 कलम आणि राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी विश्वासात केला. हिंदुत्वाला ठोकर मारत हिंदुत्वालाच आतंकवादी म्हणणाऱ्या माणसांसोबत जाताना त्यांना लाज वाटली नाही, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तसेच यावेळेला आम्ही ती चूक करणार नाही. महाराष्ट्रात महायुतीलाच बहुमत मिळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी यांनी व्यक्त केला.

डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी प्रचारसभा : विंग (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुल गांधींचा घेतला समाचार : अग्निवीरांबाबत चुकीचे बोलणाऱ्या राहुल गांधींच्या भूल थापांना युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन करत ना. शहा म्हणाले, त्यांच्याप्रमाणे खोटे वायदे न करतात आम्ही महाराष्ट्रातील सर्व अग्निवीरांना केंद्र व राज्य सरकारची पेन्शन मिळेल अशी नोकरी देणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सातारा ही वीरांची भूमी असून येथील वीरांना आणि वीरमातांना मी प्रणाम करतो. मोदींनी ‘वन रँक वन पेन्शन’च्या माध्यमातून एक लाख 55 हजार कोटी रूपये जवानांच्या खात्यावर जमा केल्याची त्यांनी सांगितले.













