श्रीनिवास पाटील; कराडला अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाचा शुभारंभ
कराड/प्रतिनिधी : –
राजकारण, समाजकारणातून विकासकारण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण तितकेच मोठे साहित्यिक होते. आज त्याची कर्मभूमी असलेल्या यशवंतनगरीत होणाऱ्या नवोदित साहित्य संमेलनातून साहित्यिकांना यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे धन प्राप्त व्हावे; हीच या संमेलनाची खरी पूर्ती ठरेल, असा विश्वास माजी खासदार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.













