राज्यात पहिल्यांदाच राबवला पायलट प्रोजेक्ट; आमदार मनोज घोरपडे यांचा पुढाकार, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नकाशा वाटप
कराड/प्रतिनिधी : –
तारळी धरणातील पुनर्वसित भांबे गावात महसूल विभाग, वनविभाग व भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे पायलट प्रोजेक्ट राबवत राज्यात प्रथमच पुनर्वसित गावातील ४० ग्रामस्थांची नावे सातबाऱ्यावर आणण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या ग्रामस्थांना नकाशा वाटप करण्यात आले. आमदार मनोज घोरपडे यांनी सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून राज्यात पहिल्यांदाच पुनर्वसितांची नावे सातबाऱ्यावर लागली आहेत.
मान्यवरांची उपस्थिती : गुरूवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी संतोष पाटील पुनर्वसित भांबे गावात दाखल झाले. यावेळी आमदार मनोज घोरपडे, धरणग्रस्ताचे नेते डॉ. भारत पाटणकर, जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक वसंत निकम, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, कण्हेर कालवे, करावी २ चे कार्यकारी अभियंता राहुल घनवट, भूमी अभिलेखचे उप अधीक्षक प्रवीण पवार, नायब तहसीलदार महेश उबारे, मंडल अधिकारी श्रीकांत धनवडे व महसूल विभाग, वनविभाग व भूमी अभिलेखचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.













