कराड/प्रतिनिधी : –
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट आणि सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. नागरिकांना शासकीय योजनांसाठी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उपयुक्त ठरत आहे. कराड दक्षिण मतदारसंघात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.










