Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Fri, 30 May 2025 17:53:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 श्री. अंबामाता मंदिरात आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा https://janswarashtra.com/archives/5848 https://janswarashtra.com/archives/5848#respond Fri, 30 May 2025 17:48:22 +0000 https://janswarashtra.com/?p=5848 कराड/प्रतिनिधी : –  कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या विजयासाठी वाठार (कि.) येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ नारायण गायकवाड यांनी ग्रामदैवत श्री. अंबामाता देवीच्या चरणी नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात देवीचा अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आणि नेत्यामधील प्रेमाची चर्चा : या अभिषेक विधीला आमदार घोरपडे ... Read more

The post श्री. अंबामाता मंदिरात आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराड/प्रतिनिधी : – 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या विजयासाठी वाठार (कि.) येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ नारायण गायकवाड यांनी ग्रामदैवत श्री. अंबामाता देवीच्या चरणी नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात देवीचा अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी आणि नेत्यामधील प्रेमाची चर्चा : या अभिषेक विधीला आमदार घोरपडे आणि त्यांच्या पत्नी सौ. समता ताई घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांने केलेला नवस आमदार मनोज घोरपडे यांनी सपत्नीक उपस्थित राहून नवस पूर्ण केल्याने पंढरीनाथ गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले. कार्यकर्ता आणि नेत्यामधील या प्रेमाची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा होती.

मान्यवरांची उपस्थिती : या अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विकास गायकवाड (आण्णा), सचिन गायकवाड (ग्रामसेवक), सीताराम गायकवाड (तंटामुक्ती अध्यक्ष), वसंत (आबा) गायकवाड (ज्येष्ठ नागरिक उपाध्यक्ष), रामचंद्र (गुरुजी) गायकवाड, सुरेश गायकवाड (दादा), बाळू पाटील, चंद्रकांत (आण्णा) गायकवाड, गणेश (बापू) गायकवाड, शांताराम गायकवाड, दत्तात्रय पाटील, बापू व विलास बोरकर, प्रकाश गायकवाड, सोमनाथ (महाराज) गायकवाड, दत्ता (दादा) गायकवाड, बाळू निवृत्ती गायकवाड, प्रकाश कांबळे, आप्पा बुवा गायकवाड, सुदाम गायकवाड, शामराव जाधव, पांडुरंग खिलारे, संजय (सर) गायकवाड, प्रदीप भंडलकर, हणमंत भंडलकर, रमेश देशमुख, संजय मुळे, महादेव खिलारे, नारायण (नाना) गायकवाड, चंद्रकांत उमरदंड, सुरज घोरपडे, विक्रम गायकवाड, विठ्ठल जाधव, विनायक जंगम, प्रवीण गायकवाड, शिवाजी आप्पा गायकवाड, भगवान ठोंबरे, मनोज गायकवाड, शुभम खिलारे, यश शिंदे, शुभम गायकवाड यांचा समावेश होता.

परिसरातील नागरिकांचीही उपस्थिती : या कार्यक्रमास परिसरातील नागझरी, आर्वी, जयपूर, वेळू, सुर्ली, किरोली, तारगाव, दुर्गळवाडी, मोहितेवाडी, जिहे येथूनही नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये पै. सोमनाथ भोसले, गणेश भोसले, दत्तात्रय यादव, कल्याण जाधव, सोमनाथ निकम (फौजी), रोहित भोसले, सुहास पंडित, सुरेश पवार, रामचंद्र चव्हाण, लक्ष्मण जाधव, राजु मोरे, टिंकू निकम, निलेश जाधव, सचिन गोळे, नरसिंग फडतरे आणि विक्रमसिंह फडतरे यांचा समावेश होता.

देवीच्या चरणी व्यक्त केली कृतज्ञता : या अभिषेक विधीचे धार्मिक कार्य श्री. देविदास गुरव व बंडू काका यांनी पार पाडले. यानंतर ग्रामस्थांनी देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि आमदार घोरपडे यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

The post श्री. अंबामाता मंदिरात आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5848/feed 0
वर्णे व नागठाणे जि.प. गटाची जलजीवनची आढावा बैठक उत्साहात https://janswarashtra.com/archives/5843 https://janswarashtra.com/archives/5843#respond Fri, 30 May 2025 17:23:33 +0000 https://janswarashtra.com/?p=5843 कराड/प्रतिनिधी : – वर्णे व नागठाणे जिल्हा परिषद गटातील जल जीवन मिशन योजनेच्या आढावा बैठक असेम्बली हॉल, अपशिंगे (मि.) येथे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अधिकाऱ्यांना दिल्या सूचना : या बैठकीत संबंधित गटातील सर्व गावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रलंबित व रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार घोरपडे यांनी ... Read more

The post वर्णे व नागठाणे जि.प. गटाची जलजीवनची आढावा बैठक उत्साहात first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराड/प्रतिनिधी : –

वर्णे व नागठाणे जिल्हा परिषद गटातील जल जीवन मिशन योजनेच्या आढावा बैठक असेम्बली हॉल, अपशिंगे (मि.) येथे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

अधिकाऱ्यांना दिल्या सूचना : या बैठकीत संबंधित गटातील सर्व गावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रलंबित व रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार घोरपडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती : या बैठकीस राक्षे साहेब (विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत), मुल्ला साहेब (उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती सातारा), झोरे मॅडम (विस्तार अधिकारी), संजय पांढरे (शाखा अभियंता), तुषार निकम (सरपंच, अपशिंगे मि.), संजय घोरपडे (पंचायत समिती सदस्य), तानाजी जाधव (सरपंच, अतीत), पृथ्वीराज निकम (माजी पंचायत समिती सदस्य), सुभाष निकम, ऍड. धनाजी जाधव (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा), कमलेश निकम, ज्ञानदेव निकम, संजय निकम (सरपंच) तसेच भागातील सर्व ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शेतकरी व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post वर्णे व नागठाणे जि.प. गटाची जलजीवनची आढावा बैठक उत्साहात first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5843/feed 0
शिवतीर्थासह स्मारक सुशोभीकरणाचे रविवारी भूमिपूजन https://janswarashtra.com/archives/5839 https://janswarashtra.com/archives/5839#respond Fri, 30 May 2025 17:16:12 +0000 https://janswarashtra.com/?p=5839 कराडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम  कराड/प्रतिनिधी : – तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या कराडमधील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व अन्य स्मारकांच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन रविवारी (दि. १) जून रोजी सकाळी ११ वाजता ... Read more

The post शिवतीर्थासह स्मारक सुशोभीकरणाचे रविवारी भूमिपूजन first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम 

कराड/प्रतिनिधी : –

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या कराडमधील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व अन्य स्मारकांच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन रविवारी (दि. १) जून रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास आमदार डॉ. अतुल भोसले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह शहरातील माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती असणार आहे.

पाच कोटींचा निधी मंजूर : शिवतीर्थ दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

…या पुतळ्यांचेही होणार सुशोभीकरण : याबरोबरच बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, महात्मा फुले पुतळा सुशोभीकरण, अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजनही होणार आहे. तसेच शुक्रवार पेठेतील जुने जलशुद्धीकरण केंद्रातील जागेत मराठा समाज मंदिर, डवरी समाज मंदिर व स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजनही या दिवशी होणार आहे.

राजेंद्रसिंह यादव यांनी आणला निधी : या कार्यक्रमास यशवंत विकास आघाडीचे सर्व माजी नगरसेवक, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती असणार आहे. राजेंद्रसिंह यादव यांनी महायुती शासनाकडे पाठपुरावा करून या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये शिवसेना मेळावा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची तयारी सुरू आहे. या अनुषंगाने रविवारी १ जून रोजी दुपारी १२ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे व शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

The post शिवतीर्थासह स्मारक सुशोभीकरणाचे रविवारी भूमिपूजन first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5839/feed 0
“साक्षात देव भेटला…”; कॅन्सरमुक्त महिलांचे डॉ. सुरेश भोसले यांना कृतज्ञ अभिवादन https://janswarashtra.com/archives/5832 https://janswarashtra.com/archives/5832#respond Fri, 30 May 2025 11:44:47 +0000 https://janswarashtra.com/?p=5832 कराड/प्रतिनिधी : –  “कॅन्सर झाला हे समजताच जीव घाबरला होता. पण कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉ. सुरेश भोसले यांच्या रुपात साक्षात देव भेटला,” अशा भावोत्कट शब्दांत कॅन्सरमुक्त झालेल्या महिलांनी आपली कृतज्ञता व्यक्त करत डॉ. सुरेश भोसले यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला. कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठक : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आणि प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुरेश भोसले ... Read more

The post “साक्षात देव भेटला…”; कॅन्सरमुक्त महिलांचे डॉ. सुरेश भोसले यांना कृतज्ञ अभिवादन first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराड/प्रतिनिधी : – 

“कॅन्सर झाला हे समजताच जीव घाबरला होता. पण कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉ. सुरेश भोसले यांच्या रुपात साक्षात देव भेटला,” अशा भावोत्कट शब्दांत कॅन्सरमुक्त झालेल्या महिलांनी आपली कृतज्ञता व्यक्त करत डॉ. सुरेश भोसले यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.

कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठक : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आणि प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांनी कथन केला जीवन संघर्ष : यावेळी उपचाराने कॅन्सरवर मात केलेल्या महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष कथन करत डॉ. भोसले यांनी दिलेल्या वैद्यकीय आणि मानसिक आधाराचे स्मरण केले. “कृष्णा हॉस्पिटल म्हणजे आमच्यासाठी मंदिर आहे आणि सुरेशबाबा हे त्या मंदिरातील देव आहेत,” असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी राज्याचे माजी क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. सुवर्णादेवी देशमुख, डॉ. विजय कणसे, डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा : कॅन्सरचे निदान झाल्यानंतर रुग्ण नैराश्यात जात असल्याचे सांगत यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज वेळेवर निदान व उपचार केल्यास रुग्ण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यामुळे रुग्णांनी भीती न बाळगता सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.”

स्वागत : कार्यक्रमाचे स्वागत डॉ. प्रणिता पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्य नर्सिंग ऑफिसर रोहिणी बाबर यांनी केले. तर डॉ. सुजाता कानिटकर यांनी आभार मानले.

 

The post “साक्षात देव भेटला…”; कॅन्सरमुक्त महिलांचे डॉ. सुरेश भोसले यांना कृतज्ञ अभिवादन first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5832/feed 0
सळसळत्या उत्साहाचा सत्तरीतील तरूण : डॉ. सुरेशबाबा https://janswarashtra.com/archives/5822 https://janswarashtra.com/archives/5822#respond Fri, 30 May 2025 03:41:28 +0000 https://janswarashtra.com/?p=5822 २०१२ ची १२ मार्च ही तारीख. वेळ सायंकाळची. पुण्याच्या बालेवाडी क्रिडा संकुलात एक मोठा शाही विवाह सोहळा संपन्न होत होता. गोरज मुहूर्तावर तो झाला, आणि वधुवरांना शुभेच्छा देण्यासाठी एकच झुंबड उडाली. केवळ कृष्णा – मांजरा काठचे, कराड – लातुरचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील अफाट जनसमुदाय उपस्थित होता. त्यात मोठमोठ्या सेलिब्रिटीज् बरोबर महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा भरणा ... Read more

The post सळसळत्या उत्साहाचा सत्तरीतील तरूण : डॉ. सुरेशबाबा first appeared on Jan Swarashtra.

]]>

२०१२ ची १२ मार्च ही तारीख. वेळ सायंकाळची. पुण्याच्या बालेवाडी क्रिडा संकुलात एक मोठा शाही विवाह सोहळा संपन्न होत होता. गोरज मुहूर्तावर तो झाला, आणि वधुवरांना शुभेच्छा देण्यासाठी एकच झुंबड उडाली. केवळ कृष्णा – मांजरा काठचे, कराड – लातुरचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील अफाट जनसमुदाय उपस्थित होता. त्यात मोठमोठ्या सेलिब्रिटीज् बरोबर महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा भरणा लक्ष वेधून घेत होता. कारण दोन्ही घराणी मातब्बर होती,  जनसामान्यांशी नाळ जोडलेली होती. रांगेने शुभेच्छा दिल्या जात होत्या. तिकडे निघालेला एक शेतकरी म्हणाला, ‘ जोडा लक्ष्मी नारायणाचा आहे, मुलाच्या बाजूला उभे राहिलेले त्यांचे मोठे भाऊ का हो?’  हसू आवरल आणि उत्तरलो,  ‘ छे हो, ते त्यांचे वडील! ‘  विचारणारा बघतच राहिला….. प्रसंग ओळखलाच असेल. सध्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि गौरवीताई देशमुख यांच्या लग्नाचा आणि त्यांच्या सोबत जे उभे होते ते डॉ. सुरेशबाबा. एका साध्या शेतकऱ्याकडून त्यांच्या लोभस आणि ताज्यातवान्या व्यक्तिमत्वाला मिळालेली ही मनमोकळी दाद ! हेच तारुण्य आणि लोभासवाना  ताजेपणा आजही त्यांच्या व्यक्तिमत्वात कायम आहे. १९५५ चा ३० मे हा त्यांचा जन्मदिवस. आज त्यांना ७० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त या चुंबकीय आणि अजातशत्रू व्यक्तीमत्वाविषयी… 

खरंतर वटवृक्षाच्या छायेखाली रोपटी कोमेजतात, त्यांची नीट वाढ होत नाही, ती खुंटतात, असं बोललं जातं ; काही अंशी ते खरंही असल्याचं जाणवतं. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आपण बघतो. पण कधीतरी काहीजण  याला अपवाद ही असतात, त्यातीलच एक म्हणजे डॉ. सुरेशबाबा भोसले.

मच्छिंद्रनाथाच्या मुशीत आणि कृष्णेच्या कुशीत वसलेलं कराड तालुक्यामधील रेठरे बुद्रक हे गाव. इथले माधवराव मोहिते हे अत्यंत पुरोगामी, प्रागतिक विचारांचे शेतकरी. स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ. पाणी उपसायचे पहिले इंजिन १९१५ ला परिसरात त्यांनी आणले आणि तेव्हापासून या घराला ‘ इंजिनवाल्यांचे घर ‘ तर तिकडे जाणाऱ्या रस्त्याला ‘ इंजिन पाणंद ‘ म्हणून ओळखले जाऊ लागले. माधवरावांना तीन मुले. थोरले वसंतराव, मधले यशवंतराव आणि धाकटे जयवंतराव. पुढे वसंतराव शेतीत रमले, यशवंतराव राज्याच्या राजकारणात पडले. पुढे आमदार, खासदार, मंत्री झाले तर जयवंतरावांनी परिसराच्या उन्नतीच्या सहकार, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात आपला अवीट आणि दीर्घकालीन ठसा उमटवला. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर परिसरात सहकाराचे जाळेच निर्माण झाले आणि येथील अर्थकारणालाही वेग आला. पुढे या तिघांची ही मुले (म्हणजे माधवरावांचे नातू) अनुक्रमे मदनदादा (१९८९), डॉ. सुरेशबाबा (१९९९), आणि डॉ, इंद्रजीतबाबा (२००६) हे सुध्दा (ज्येष्ठताक्रमानुसार योगायोगाने) कारखान्याचे चेअरमन झाले. यातही डॉ. सुरेशबाबांची कारकीर्द सर्वात मोठी.

जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि सौ. जयमाला (काकीसाहेब) यांचे मधले चिरंजीव म्हणजे डॉ. सुरेशबाबा. ३० मे १९५५ चा जन्म. त्यांचे शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे तर वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर शिक्षण मिरज येथे झाले. पुढे शिक्षण घेत असताना व पूर्ण करता करता इकडे कृष्णाकाठी आप्पासाहेबांच्या कार्याचा पसारा विस्तारत होता. त्यांना मदत म्हणून बाबा कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार सहकार व आरोग्य क्षेत्रात हळूहळू कार्यरत होवू लागले. अर्थात सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढे काम करणारा गुरु, साक्षात वडिलांच्या रुपाने घरातच होता. असं नशीब फार थोड्या जणांच्याच वाटणीला येते. बाबा त्याबाबतीत भाग्यवानच आहेत. पण गुरुकडून काय घ्यायचे, निवडायचे हे त्या शिष्यावर अवलंबून असते. मुर्ती घडते जरुर, पण त्यासाठी दगड सुध्दा टाकीचे घाव सोसणारा असावा लागतो ; मुरुमाच्या दगडातुन मुर्ती घडत नाहीत!

डॉ. सुरेशबाबांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील कामाची सुरुवात कृष्णा सहकारी बँकेपासून १९८३-८४ च्या आसपास केली. त्यातून ते समाज परिचित झाले. तो काळ म्हणजे विसाव्या शतकाचा संधीकाल आणि एकविसाव्या शतकाच्या चाहुलीचा.  अनेक आव्हानांचा, तर स्थानिक पातळीवर महाराष्ट्रभर गाजलेल्या सहकारातील मोहिते भोसले घरांच्या पराकोटीच्या ऐतिहासिक संघर्षाचा, कटुतेचा. याच परिस्थितीत त्यांचे सार्वजनिक जीवनातील पदार्पण झाले. कृष्णेच्या निवडणुकांत  सुरुवातीला अपयश आलं. काळ कसोटीचा होता.  कारखाना नव्हता, परंतु तरीसुध्दा या घराची जिद्द आणि हिंमत बुलंद होती. कारखाना जरी गेला असला तरी त्यांच्याकडे असलेल्या अन्य संस्थाचा कारभार (विरोधकांनी आणलेल्या अडथळ्यांना दुर्लक्षित करत) सुरळीत सुरु होता. किबंहुना व्याप वाढतच होता. १९९९ ला कारखाना निवडणूक झाली सत्ता पुन्हा भोसले गटाकडे आली. आप्पासाहेब संचालक झाले तर बाबांकडे चेअरमन पदाची धुरा आली.

आप्पासाहेबांचे खंबीर मार्गदर्शन, आधार असला तरी देखील या नव्या चेअरमनच्या कसोटीचा हा काळ होता. कारण संपूर्ण सहकारी साखर कारखानदारीला याच काळात अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाना तोंड द्यावे लागले. ऊसावरचा लोकरी मावा, त्यामुळे कमी उत्पादन, झोन बंदी उठल्यावर वाढलेली स्पर्धा आणि त्यामळे भविष्यकालीन अनिश्चितता आणि हे  कमी की काय म्हणून साखरेचे कमालीचे गडगडलेले भाव, असा तो आव्हानात्मक काळ. यातून मार्ग काढायचा होता. आणि इथेच त्याचं नेतृत्व खऱ्या अर्थाने उजळून निघाले, असं म्हणावं लागेल. ‘When going gets though, the though gets going’ या उक्तीनुसार त्यांनी या संकटांचा समर्थपणे मुकाबला केला. साखर पोत्याच्या क्विटंल भावापेक्षा ऊसाला प्रतिटन जादा दर देणारे, भागविकास निधीचा थेट वाटा सभासदांपर्यंत पारदर्शकपणे पोहचविणारे, चेअरमन म्हणून ते ओळखले जाऊ लागले. आणि यातूनच त्यांची ‘ संकटमोचक ‘ (Crises man) ही प्रतिमा तयार होऊ लागली. आणि या संकटांच्या काळातही त्यांनी आपली विकासदृष्टी सोडली नाही. कारखान्याच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण केले, बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती केली. आजही तो व्यवस्थित सुरु आहे. कृष्णा कृषी महाविद्यालयाची मंजुरी आणि स्थापना हि सुद्धा याच काळात, हे सगळे श्रेय डॉ. सुरेशबाबांचे. ‘Management is doing the things right, leadership is doing the right things’  या उक्तीचा प्रत्यय आणि या दोन्ही गोष्टींचा सुरेख समन्वय बाबांच्या रुपाने परिसराने पाहिला.

पुन्हा सतांत्तर झाले. त्यानंतर सुमारे १० वर्ष बाबा आणि भोसले गट कारखान्याच्या कारभारापासून लांब राहिले.  पण त्यांची कार्यकर्त्यांच्या संघटनेची बांधणी भक्कम तर होतीच उलट ती अधिकच बळकट होत गेली. या गटाचे एक वैशिष्ट्य राजकीय विश्लेषक नेहमी सांगतात, की पराभवाने खचून न जाता ते संकटांतही संधी शोधतात ! याचा प्रत्त्यय अनेक वेळा परिसराने घेतला आहे. सत्ता नसतानाही त्यांनी काही नवीन संस्था स्थापन केल्याच त्याचबरोबर इतर असलेल्या संस्थाही भरभराटीला आणल्या. सध्या तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट मानल्या जाणा-या जयवंत शुगर्सची स्थापना सर्वसाधारण याच दरम्यानची , या कारखान्यामुळे परिसरातील अतिरिक्त उसाच्या गाळपाची सोय तर झालीच पण एक उद्योग उभा राहिला, रोजगार निर्मिती झाली. अर्थकारणाला गती आली.

दरम्यान, वयोमान आणि प्रकृती आस्वास्थ्येमुळे आप्पासाहेब आता थकत चालले होते, त्यांनी हळूहळू कारभारातून लक्ष कमी करायला सुरुवात केली आणि आपल्या आवडत्या लेखन, चिंतनात वेळ गुंतवू लागले. नकळतपणे कृष्णा उ‌द्योग समूहाचे प्रमुख म्हणून बाबांकडे ही जबाबदारी आली. पसारा छोटा नव्हता आणि नाही. कृष्णा कारखाना, बँक, कृषी उ‌द्योग संघ, मयुर पोल्ट्री, चॅरिटेबल ट्रस्ट, हॉस्पिटल, अभिमत वि‌द्यापीठ, मेडिकल कॉलेज व अन्य वैद्यकीय महाविद्यालये, जयवंत शुगर्स, कृष्णा सरिता बझार, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, कृष्णा फौंडेशन, कामगार सोसायटी, पतसंस्था, ग्रामीण विश्वस्त संघ इत्यादी आणि अनेक संस्था, ही काही उदाहरणे. या सर्व संस्थांचा कारभार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बघत, वाढवत, आप्पांनी निर्मिलेल्या कार्यकर्त्यांची संघटना ही त्यांना न दुखवता जपण्याची आणि वृद्धिंगत करण्याची कसरत हसतमुखाने करणे, हे मोठेच कठीण काम होते. तेही बाबांनी सहजपणे केले. तीन पिढीतल्या कार्यकर्त्यांशी तितक्याच आपलेपणाने स्वतःला ऍडजेस्ट करून संवाद साधणे हे येरागबाळ्याचे कामच नोहे ! त्यासाठी जातीचेच पाहिजे ! अलीकडे त्यांचे दोन्ही सुपुत्र डॉ. अतुलबाबा व विनूबाबा यांची मदत त्यांना होतीय खरे, पण तरीही व्याप वाढतोच आहे ! वाढता वाढता वाढे !

डॉ. सुरेशबाबा यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मला कायम एक कुतूहल वाटत आलेले आहे की, हा माणूस एवढा प्रचंड डोलारा सांभाळताना, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकत कसा नाही. एवढी ऊर्जा येते कुठून ? ते सतत उत्साही आणि हसतमुख असतात, त्यांना चिडताना रागवताना अगदी क्वचितच अपवादात्मक लोकांनी पाहिले असेल. या व्यापातून ते आपल्या आवडी निवडी, छंद, विरंगुळयासाठी वेळ कसा काढत असतील ? आपल्यातील ‘डॉक्टर’ जपण्यासाठी ते ठराविक दिवस कॅन्सरच्या शस्त्रकिया स्वतः करतात. कधी वाचन करतात, सायंकाळी बॅडमिंटन खेळत स्वतःला फिट ठेवतात हे सगळे करत असताना ते आपला खाजगीपणा ही जपतात. हे एक मिरॅकलच ! वास्तविक सार्वजानिक जीवनातील व्यक्तीला हे सहजासहजी शक्य नसते. तरीसुद्धा ते जमवतात. बाबांची सार्वजनिक सभारंभातील हसतमुख उपस्थिती एक प्रसन्नतेचा लोभस शिडकावा देऊन जातो !

भौतिक संपन्नतेचा लाभ वारसा हक्काने सर्वानांच मिळतो. पण विचार, गुणग्राहकता, संयम, ऊर्जा, नाविण्याचा ध्यास, उद्यमशिलता, दूरदृष्टी आणि कार्य (Vision and Mission), मनमोठेपणाचा वारसा मिळतोच, असे नाही. या गोष्टी आत्मसातच कराव्या लागतात, आणि अंगी बाणवाव्या लागतात. Virtues are to be cultivated ! आणि त्यासाठी मुळात अंतःकरणाची शुद्धता आणि निर्मळता महत्वाची असते, आणि बाबांकडे ती अपरंपार आणि जेनेटिक असल्याचे ठळकपणे जाणवते.

बाबा हे काही पूर्णवेळ राजकारणी नाहीत. किंबहुना ते फार कमी राजकारणी आहेत, जास्त समाजकारणी आहेत, पण सहकारात राजकारण कधी ना कधी चिकटतेच. निवडणुका असतात त्यानिमित्ताने भाषणे करावी लागतात. आपली बाजू मांडताना प्रसंगी प्रतिस्पर्ध्यावर टीका करावी लागते. पण त्यांची विरोधकांवरील टीकाटिपण्णी ही कधीच जिव्हारी लागणारी नसते. अत्यंत संयमी भाषेत सभ्यतेचे सर्व संकेत पाळतच ते बोलतात. अनावश्यक आक्रस्ताळेपणाला स्थान नाही. म्हणून तर त्यांच्यावर टीका करताना विरोधकही दहा वेळा विचार करतात. अन्यथा त्यांच्यावर असभ्य भाषेत  केलेली टीका अंगावर येते ! म्हणून तर ‘ थोरो जंटलमन ‘ आणि ‘ अजातशत्रू ‘ अशी  राजकीय क्षेत्रातील दुर्मिळ विशेषणे त्यांच्याबाबत वापरली जातात.  सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. ४ वर्षांपूर्वी झालेल्या कृष्णा कारखान्याचा निवडणुकीत त्यांनी जो विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला त्यामध्ये त्यांच्या या प्रतिमेचा (सच्चा माणूस !) मोठाच वाटा होता. एकतर ते शब्द कमी देतात आणि दिला तर हमकास पाळतात, ही त्यांची ख्याती !

त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी कराव्या लागणाऱ्या भाषणांच्या विषयांची रेंज खूप मोठी आहे. त्यातून त्यांचा अभ्यास व सखोल ज्ञान दिसते. अभिमत विद्यापीठाच्या कार्यक्रमात शिक्षण, हॉस्पिटलच्या कार्यक्रमात आरोग्य, अन्य संस्थांच्या कार्यक्रमात अर्थ आणि विकास तर स्थानिक स्वराज संस्थात धोरण आणि व्यक्तिगत कार्यक्रमात व्यक्तीविशेष गुणगौरवपर, समयोचित भाषणे करावी लागतात,  आणि कोणतेही टिप्पण हातात न घेता अस्खलितपणे ते काही ना काही नवा आणि सकारात्मक विचार समाजाला देतात. हे त्यांचे वैशिष्ट्य! त्या त्या क्षेत्रातील आव्हानांची वस्तुस्थिती, आशेचे किरण आणि नव्या संधी ते समाजाला परिचित करून देतात. काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या एका दीक्षांत समारंभात बोलताना बाबांनी (राज्यपाल राम नाईक साहेब पाहुणे होते) एक विचार मांडला होता. ” आपल्याला जर पुढे जायचे असेल तर आपली शिक्षण पद्धती काळाबरोबरच नव्हे तर काळाच्या पुढे एक पाऊल असायला हवी !”  किती प्रेरणादायी विचार ! आणि याच विचाराने त्यांच्या शिक्षण संस्थांची वाटचाल सुरु असल्याचे दिसते. अव्वलतेचा ध्यास प्रत्येक ठिकाणी असतोच.

सार्वजनिक जीवनातील ४२ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांच्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळालेत. मिळत आहेत आणि यापुढेही मिळतील. नुकताच मिळालेला गोडबोले ट्रस्टचा ‘ सातारा भूषण ‘, नेर्लेकर ट्रस्टचा, ‘ धन्वंतरी पुरस्कार ‘, कराडच्या कालिकादेवी ग्रुपचा पुरस्कार तर काही दैनिकांचे उ‌द्योजकता आणि समाजसेवेसाठी मिळालेले पुरस्कार ही काही ठळक उदाहरणे. त्याचबरोबर लोकांचे प्रेम आणि दुवा हाच खरा पुरस्कार ते मानतात. सत्ता असो वा नसो ‘ सेवा ‘ हा या घराचा, कुटुंबाचा स्थायी स्वभाव विशेष आहे. म्हणून तर दोन तीन तालुक्यातील लोकांची सर्वाधिक गर्दी यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात नेहमीच ओसंडून वाहत असते. मोठ्या आशा व अपेक्षेने लोक त्यांच्याकडे येतात, आणि तेही बहुदा सकारात्मक फळ घेऊन जातात. शेवटी लोक आंब्याच्याच झाडांना दगड मारतात, बाभळींना नाही !

डॉ. बाबा आणि भोसले कुटुंबाच्या प्रत्येक उ‌द्योगातून शेकडो, हजारो, रोजगार उपलब्ध झाले. अनुषंगिक सेवांच्या रूपाने स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावले पण या कामाची राजकीय फलिते त्याप्रमाणात त्यांना मिळाली नाहीत किंवा उशिराने मिळाली;  हे ही जाणवतं. खरंतर पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात या कुटुंबाइतकी मोठी कामे फार क्वचित ठिकाणी झालेली आहेत. पण राजकीय फलित न मिळाल्याची खंत त्यांच्या वागण्या बोलण्यातून कधीच जाणवत नाही. सुडबुद्धी हा शब्द त्यांच्या कोषात नाही. त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांची पोरंही डॉक्टर नर्सेस केली. कोरोना काळात तर कृष्णा हॉस्पिटलचे काम देशभरात नावाजले गेले. पण या हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या कामाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून कधीच झाला नाही. कोरोनापूर्वी सहाएक वर्षांपूर्वीचा एक प्रसंग अजूनही आठवतो. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अतुलबाबांचा पराभव झाला होता. काही कार्यकर्ते भेटायला घरी गेलो होतो. डॉ. सुरेशबाबा भेटले, सर्वांच्याच दुःख आणि रागाच्या भावना तीव्र होत्या. त्याभरात बोलून गेलो. ‘ बाबा, हॉस्पिटलच्या पेशंटना बिल कपात. बिल माफी देता. ते लाड आता बंद करा. ज्यांच्यावर उपचार केले त्यांनी जरी मते दिली असती तरी अतुलबाबा सहज निवडून आले असते.’  बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलेले आणि काहीशा घुश्यातच ते म्हणाले, ‘ पुन्हा असे बोलू नका, आपण हॉस्पिटल लोकांचे सेवा करण्यासाठी काढले आहे. आणि चालवतोय, लोकांचे आरोग्य महत्त्वाचे त्याचा  राजकारणाशी काही संबंध नाही आणि यापुढेही जोडायचा नाही.  हॉस्पिटलचा उपयोग त्यासाठी होणारही नाही. आपण आपले काम करत रहायचे एवढंच ! ‘ ‘सेवा’ हाच स्वभावविशेष सिद्ध करणाऱ्या अनेकांपैकी हा एक प्रातिनिधिक प्रसंग !. दुसरा प्रसंग कोल्हापूर जवळच्या उचगावला अपंगांसाठी कार्य करणारी एक मोठी संस्था आहे. त्या संस्थेच्या कार्यक्रमाला बाबा पाहुणे होते. बाबा त्या अपंग मुला-मुलींत एवढे रमले की दिलेल्या वेळेपेक्षा दोनएक तास जास्तच त्यांच्या सहवासात रेंगाळले. त्यांच्याशी संवाद साधला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मदतीचा शब्द ही दिला! ही सुहृदयता, ओलावा येतो कुठून ?

या कुटुंबाच्या माध्यमातून या परिसरात कृषी, औद्योगिक, आरोग्य, सहकार क्षेत्राशी संबंधी आंत्रप्रणरशिप आणि त्यातून साकारलेली छोटी का होईना, परंतु, ‘ कल्याणकारी ‘ अर्थव्यवस्था जन्माला आली, हे नाकारता येत नाही. आणि यामध्ये बाबा, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी यांचे योगदान मोलाचे आहे. कुटुंबियांचा उल्लेख आल्यावर, त्यांच्या दोन मुले डॉ. अतुलबाबा आणि विनायकबाबा  यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. हे दोघेही बाबांचा भार बराचसा हलका करतात. हे दोघे उद्या आपल्या कर्तृत्वाने राजकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रात खूपच मोठी भरारी घेतील, अशी खात्री लोकांना वाटते. त्याचबरोबर ‘Behind the success of every man is a woman’ असे म्हटले जाते. सौ. उत्तरावहिनी मोठ्या बाबांना साथ देताना संघर्षाच्या काळात त्यांच्यामागे सावलीसारख्या ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी घरची आघाडी तर समर्थपणे संभाळलीच, त्याचबरोबर त्यांचा विशेषतः महिलांशी असलेला जनसंपर्क या कुटुंबाशी वेळोवेळी महत्वाचा ठरला. आजही त्या महिला मेळावा, हळदीकुंकू किंवा अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून परिसरातील अनेक परिवारांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे, घरगुती संबंध टिकवून आहेत. राजकीय धकाधकीच्या वातावरणातही त्यांनी आपलं ‘ घरपण ‘जपलं. मुलांवरच्या संस्कारात कमी पडल्या नाहीत. हे कर्तव्य संभाळातच त्या कृष्णा सरिता बझार चा कारभार पाहतात, तर सौ. गौरवीताईंना माहेरचा मोठाच राजकीय वारसा लाभला आहे, त्याचा प्रत्यय त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिला आहे ! म्हणूनच कुटुंबवत्सल बाबांच्या आत्तापर्यंतच्या यशस्वी वाटचालीत या सदस्यांचे योगदान महत्त्वाचे आहे !!

बाबांचे व्यक्तिमत्व, त्यांचे कार्य, त्यांनी दाखवलेली दिशा, एका लेखाच्या शब्द मर्यादेत बसविणे खूप अवघड आणि आव्हानात्मक आहे. पण एक विशेष म्हणजे त्यासाठी उसना किंवा खोटा अभिनिवेश आणावा लागत नाही. आज ते वयाची सत्तरी पूर्ण करताहेत.  त्यांच्या वाटचालीसाठी ७० हा फक्त एक अंक किंवा स्वल्पविराम आहे. असेच म्हणाव लागेल. कारण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. रेठरे  झाले, नंतर कराड त्यानंतर धावरवाडी झाली. आणि आता त्यांना आता शिरवळ खुणावतयं. अशी उद्योगी माणस किनाऱ्यावर कधी समाधान मानत नाहीत, तर मुशाफिरीसाठी सागरालाच, ‘ किनारा तुला पामराला ‘ असं आव्हान देत असतात.

आइनस्टाईन म्हणतो,  ‘ Life is like riding a bicycle, to keep your balance you must keep moving ‘. बाबांच्या कारकीर्दीच वर्णन आणि सार या एका वाक्यात आलय असं वाटतं. त्यांच्या आजोबांनी विकासाची ‘ पाणंद ‘ निर्माण केली;  चुलते – वडिलांनी पक्का रस्ता बनवला बाबांच्या पिढीने त्याचा हायवे केला. आता पुढच्या पिढीने विकासाच्या लेन्स वाढवून फ्लायओव्हर करावा याच त्यांच्या अपेक्षा असणार हे निश्चित.  आणि ही अपेक्षा पूर्तीची कृतार्थता त्यांना लवकरच मिळेल ही खात्री आहे. कारण नियतीला निश्चय आणि निग्रहांची साथ मिळाली की निर्मिती होतेच होते ! आणि तो एव्हरग्रीन आनंद एव्हरग्रीन बाबांना उदंड आणि अखंडपणे मिळत राहो याच जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

 

–  राजेंद्र मोहिते

(ज्येष्ठ पत्रकार, रेठरे बुद्रुक) 

       7350038910 

The post सळसळत्या उत्साहाचा सत्तरीतील तरूण : डॉ. सुरेशबाबा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5822/feed 0
आमदार अतुलबाबांचे कार्य वाखानण्याजोगे  https://janswarashtra.com/archives/5815 https://janswarashtra.com/archives/5815#respond Thu, 29 May 2025 18:32:35 +0000 https://janswarashtra.com/?p=5815 आमदार रवींद्र चव्हाण; मंडलनिहाय तिरंगा यात्रांच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक  कराड/प्रतिनिधी : –  आमदार अतुलबाबा भोसले हे दमदार नेतृत्व आहेत. पक्षाने त्यांच्यावर आतापर्यंत दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पेलल्या आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांना सातारा जिल्हाध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा संपूर्णत: भाजपमय होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी ... Read more

The post आमदार अतुलबाबांचे कार्य वाखानण्याजोगे  first appeared on Jan Swarashtra.

]]>

आमदार रवींद्र चव्हाण; मंडलनिहाय तिरंगा यात्रांच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक 

कराड/प्रतिनिधी : – 

आमदार अतुलबाबा भोसले हे दमदार नेतृत्व आहेत. पक्षाने त्यांच्यावर आतापर्यंत दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पेलल्या आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांना सातारा जिल्हाध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा संपूर्णत: भाजपमय होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

माध्यमांशी संवाद : मलकापूर येथे महिला मेळावा आणि जाहीर कार्यकर्ता पक्षप्रवेश अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

अतुलबाबांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आलोय : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य महिला मेळावा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आपण आज येथे आलो आहोत, असे सांगत आमदार चव्हाण म्हणाले, महिला मेळावा कार्यक्रमात जवळपास दहा हजार बांधकाम कामगार महिलांना भांडी वाटप करण्यात आले, ही कौतुकाची बाब असून सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलही आपण त्यांचे कौतुक केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सैन्यदलाच्या समर्थनार्थ १२५० पेक्षा जास्त तिरंगा यात्रा : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलाने राबवलेले ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. त्यानंतर देशभरात भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ १२५० पेक्षा जास्त तिरंगा यात्रा निघाल्या. यामध्ये सातारा जिल्हा, तसेच कराड तालुक्यातील मंडलनिहाय तिरंगा यात्रा यशस्वीपणे काढण्यात आल्या. याबद्दलही आपण आ. अतुलबाबांचे कौतुक केल्याचे आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

The post आमदार अतुलबाबांचे कार्य वाखानण्याजोगे  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5815/feed 0
सशक्त भारत निर्मितीसाठी भाजपा हीच काळाची गरज https://janswarashtra.com/archives/5808 https://janswarashtra.com/archives/5808#respond Thu, 29 May 2025 18:21:54 +0000 https://janswarashtra.com/?p=5808 आमदार रवींद्र चव्हाण; भाजपमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश  कराड/प्रतिनिधी : – केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस, त्यानुसार स्थानिक पातळीवरही एक विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. यासाठी ‘ग्रामपंचायत ते विधानसभा, शत प्रतिशत भाजपा’ हे उद्दिष्ट ठेवून सशक्त भारत निर्माण करायचा असेल तर, भाजपा हीच काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन त्यादृष्टीने सर्वांनी पावले उचलावीत, ... Read more

The post सशक्त भारत निर्मितीसाठी भाजपा हीच काळाची गरज first appeared on Jan Swarashtra.

]]>

आमदार रवींद्र चव्हाण; भाजपमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश 

कराड/प्रतिनिधी : –

केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस, त्यानुसार स्थानिक पातळीवरही एक विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. यासाठी ‘ग्रामपंचायत ते विधानसभा, शत प्रतिशत भाजपा’ हे उद्दिष्ट ठेवून सशक्त भारत निर्माण करायचा असेल तर, भाजपा हीच काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन त्यादृष्टीने सर्वांनी पावले उचलावीत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.

जाहीर पक्षप्रवेश : मलकापूर येथे आमदार अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे (NMDC) संचालक अ‍ॅड. भरत पाटील, विक्रम पावसकर, माजी आमदार आनंदराव पाटील, दिलीप येळगावकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, गौरवी भोसले, बाळासाहेब वाघ, नितीन कौले, सिद्धी भोसले, सुवर्णा पाटील, आदर्श सरपंच नरेंद्र पाटील आदींची  प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने सर्वात पुढे : येणाऱ्या काळात शेजारील देश अतिरेकी हल्ले घडवून आणतील. त्यांना भारतीय सैन्यदल चोख प्रत्युत्तर देत असल्याचे सांगत आमदार चव्हाण म्हणाले, नरेंद्र मोदी आणि सैन्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमुलाग्र बदल येणाऱ्या काळात देशभरात होताना दिसेल. पूर्वीच्या यूपीए सरकारने केवळ रोटी, कपडा आणि मकान एवढीच आश्वासने दिली. मात्र, त्यांनी सर्व बाबतीत जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. मोदींनी प्रत्येक गरिबाला घरे दिले, आयुष्मान भारतच्या माध्यमातून मोफत उपचार दिले, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिणेतील जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी : कराड दक्षिणमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजपचा आमदार निवडून आला. सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहिले, असे सांगत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, निवडणूक विरहित राजकारण ही भाजपची परंपरा असून त्यादृष्टीने आपण काम करत आहोत. आमदार झाल्यानंतर २४ तास लोकांची सेवा करण्याचे धोरण आपण अवलंबले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या सगळ्या योजना मोठ्या प्रमाणात राबवण्याचे काम करणार आहे.

सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान : पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी पेलताना सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे सांगत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा सर्वांना मोठे करणारा पक्ष आहे. आपण सर्वजण पक्षाच्या पाठीमागे ताकतीने उभे राहा. सातारा जिल्हा भाजपचा खऱ्या अर्थाने बालेकिल्ला बनवण्यासाठी आपण पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहोत. येत्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी आ. चव्हाण यांना दिली.

अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

जखिणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, मारुती नलवडे, सरपंच शंकर झिमरे, उपसरपंच चंद्रकांत नलवडे, सुनील नलवडे, तुकाराम पाटील, दादासो पाटील, अशोक पाटील, दत्तात्रय नलवडे, पांडुरंग नलवडे, नानासो कणसे, पोपट झिमरे, सौ. रुपाली हुबाले, माजी सरपंच सुवर्णा बुधे, माजी सरपंच सुनंदा पाटील, वैशाली मोरे, छाया पाटील, सुनंदा शिंदे, अशोक शिंदे, वसंत बाबर, नांदलापूरचे सरपंच मानसिंग लावंड, विलास शिर्के, माजी सरपंच राजाराम शिर्के, माजी उपसरपंच प्रकाश ढेबे, सूरज ढगे , धोंडीराम शिर्के, माजी सरपंच उत्तम शिर्के, शरद ढेबे, आशीष ढेबे, राहुल कचरे, अशोक नलवडे, विकास लावंड आदींनी आमदार अतुलबाबा यांच्या नेतृत्वाखाली व आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला.

The post सशक्त भारत निर्मितीसाठी भाजपा हीच काळाची गरज first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5808/feed 0
आदर्श लोकप्रतिनिधी कसे काम करतो, हे अतुलबाबांकडे पाहिल्यावर समजते  https://janswarashtra.com/archives/5799 https://janswarashtra.com/archives/5799#respond Thu, 29 May 2025 18:06:57 +0000 https://janswarashtra.com/?p=5799 आमदार रवींद्र चव्हाण; मलकापूर येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न कराड/प्रतिनिधी : –  आमदार डॉ. अतुलबाबा भोसले केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे करत आहेत. एक आदर्श लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करू शकतो, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते, असे गौरवोद्गार भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी काढले. भव्य महिला मेळावा : ... Read more

The post आदर्श लोकप्रतिनिधी कसे काम करतो, हे अतुलबाबांकडे पाहिल्यावर समजते  first appeared on Jan Swarashtra.

]]>

आमदार रवींद्र चव्हाण; मलकापूर येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न

कराड/प्रतिनिधी : – 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे करत आहेत. एक आदर्श लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करू शकतो, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते, असे गौरवोद्गार भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी काढले.

भव्य महिला मेळावा : मलकापूर येथे आमदार अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास हजारो महिलांची उपस्थिती होती.

मलकापूर : महिला मेळाव्यास उपस्थित हजारो महिला, माता-भगिनी.

अतुलबाबांचे हात बळकट करा :  अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आमदार अतुलबाबा भोसले यांनी महिला मेळावा घेत तब्बल दहा हजार महिलांना भांडी वाटप केले, ही कौतुकाचे बाब असल्याचे सांगत आमदार चव्हाण म्हणाले, येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्वांनी त्यांचे हात बळकट करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अहिल्यादेवींच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी महिला मेळावा : अहिल्यादेवी होळकर यांनी सतराव्या शतकात महिलांना स्वायत्तता मिळावी, समान अधिकार मिळावेत, समाजातील त्यांचे स्थान उंचवावे, यासाठी काम केले. त्यांच्या समाजोपयोगी कामाचे अवलोकन करण्यासाठी आपण हा महिला मेळावा घेतला असल्याचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.

मलकापूर : महिला मेळाव्याप्रसंगी बांधकाम कामगार महिलांना भांडी संच वाटप करताना आमदार रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व मान्यवर.

फडणवीस सरकार असेपर्यंत योजना बंद होणार नाही : लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्ती असल्याची टीका विरोधकांनी केली. मात्र, माता-भगिनींसाठी आधी निधी, त्यानंतर विकासकामांना हे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवून ही योजना सुरू ठेवली आहे, असे सांगत अतुलबाबा म्हणाले, जोपर्यंत फडणवीस सरकार आहे, तोपर्यंत ही योजना बंद पडणार नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या विविध योजनांचा आढावा यांनी घेतला. तसेच निवडणुकीआधी आपण दहा हजार महिलांना भांडी वाटप केले. आज कोणतीही निवडणूक नसताना आणखी दहा हजार महिलांना भांडी वाटप होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

The post आदर्श लोकप्रतिनिधी कसे काम करतो, हे अतुलबाबांकडे पाहिल्यावर समजते  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5799/feed 0
कृष्णा कारखान्यात फिल्ड स्टाफ आपल्या दारी उपक्रमाचा प्रारंभ https://janswarashtra.com/archives/5794 https://janswarashtra.com/archives/5794#respond Wed, 28 May 2025 18:52:07 +0000 https://janswarashtra.com/?p=5794 कराड/प्रतिनिधी : – कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. आता कृष्णा कारखान्यात सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी आणि मार्गदर्शनासाठी ‘फिल्ड स्टाफ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती : ... Read more

The post कृष्णा कारखान्यात फिल्ड स्टाफ आपल्या दारी उपक्रमाचा प्रारंभ first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. आता कृष्णा कारखान्यात सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी आणि मार्गदर्शनासाठी ‘फिल्ड स्टाफ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, प्राचार्य डॉ.अशोक फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध उपक्रम : कृष्णा कारखाना सभासद शेतकर्‍यांचे उत्पादन वाढीसाठी जयवंत आदर्श कृषि योजना, शेतकरी संवाद मेळावे, अल्प दरात द्रवरूप जिवाणू खते, सेंद्रीय खते, माती परिक्षण, मोफत घरपोच साखर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊसनोंदी, पारदर्शक तोडणी यंत्रणा यासारखे उपक्रम कारखाना राबवित आहे. याबरोबरच आता ‘फिल्ड स्टाफ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, सभासद बंधूं-भगिनींना ऊस लागवडीपासून ते खोडवा संगोपणापर्यंतचे ऊस पिकाचे सर्व मार्गदर्शन त्यांना त्यांच्या बांधावर मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कृती आराखड्यामध्ये या बाबींचा समावेश : कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण व्हावे, उसाचे एकरी उत्पादन वाढविणेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, व कारखान्याच्या जयवंत आदर्श कृषी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे,  AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ठिबक सिंचनाचे महत्त्व, दर पंधरा दिवसातून गट ऑफिसला सभासद, अधिकारी व पदाधिकारी यांच्या भेटीतून चर्चा घडवून आणणे इत्यादी बाबींचा या कृती आराखड्यामध्ये समावेश असल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी दिली.

प्रात्यक्षिक व ट्रेनिंग : सदर उपक्रमाचे प्रात्यक्षिक व ट्रेनिंग कारखान्याच्या सर्व शेती खात्यातील कर्मचाऱ्यांना जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय येथे देण्यात आले. यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार,जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील व शेती खात्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कारखान्याकडून विशेष सत्कार

कारखान्यातील शेतकी विभागाचे गटाधिकारी मोहन पाटील यांचे प्रामाणिकपणाबद्दल, तसेच प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांची पुणे येथे माती परीक्षण आणि पाण्याचा वापर या राज्यस्तरीवर कमिटीवर ज्युरी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल, तसेच राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सॅनिटेशन विभागातील कर्मचारी मनोज हातेकर यांचा कारखान्याचे व्हा.चेअरमन जगदीश जगताप व कारखान्याचे सर्व संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

The post कृष्णा कारखान्यात फिल्ड स्टाफ आपल्या दारी उपक्रमाचा प्रारंभ first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5794/feed 0
कराड पंचायत समितीत माजी सैनिकांचा सन्मान व समस्यांवर चर्चा https://janswarashtra.com/archives/5788 https://janswarashtra.com/archives/5788#respond Wed, 28 May 2025 18:39:34 +0000 https://janswarashtra.com/?p=5788 बैठकीस प्रतिसाद; समस्या प्राधान्याने सोडवण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन कराड/प्रतिनिधी : – माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कराड पंचायत समितीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. बैठक : या बैठकीत तालुक्यातील ग्रामपंचायत व इतर स्तरावरील माजी सैनिकांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात ... Read more

The post कराड पंचायत समितीत माजी सैनिकांचा सन्मान व समस्यांवर चर्चा first appeared on Jan Swarashtra.

]]>
बैठकीस प्रतिसाद; समस्या प्राधान्याने सोडवण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन

कराड/प्रतिनिधी : –

माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कराड पंचायत समितीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

बैठक : या बैठकीत तालुक्यातील ग्रामपंचायत व इतर स्तरावरील माजी सैनिकांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

समस्या प्राधान्याने सोडविणार : यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या प्राधान्याने व तातडीने सोडवण्यात येतील, असे आश्वासित केले. याप्रसंगी सर्व माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सन्मानही केला.

मान्यवरांची उपस्थिती : या बैठकीला सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रशांत कदम, कराड तालुकाध्यक्ष सदाशिव नागणे, उपाध्यक्ष सर्जेराव देसाई, त्रिशक्ती फाउंडेशनचे सचिव विलास जाधव, कराड तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष नागेश पाटील, तसेच विविध गावांतील माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी सैनिकांनी मांडल्या समस्या : यावेळी चिखली, निगडी, पाडळी केसे, वऱ्हाडे, कोपर्डे, मलकापूर, पाली, पाचुंद, शामगाव या भागांतील माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. यावर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. बैठकीच्या समारोप प्रसंगी माजी सैनिकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या.

The post कराड पंचायत समितीत माजी सैनिकांचा सन्मान व समस्यांवर चर्चा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5788/feed 0